दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा मल्टीस्टारर सिनेमा. एका अर्थाने त्यावेळेच्या चरित्र अभिनेत्यांना ट्रीबुट होता. मला वाटत "चायना गेट" चा रिमेक करून, आजच्या काळातील सर्व चरित्र अभिनेत्यांना आपल्याकडून ट्रीबुट द्यावा. अर्थात कथेमध्ये थोडा बदल करावा लागेल. कारण अगोदरच्या सिनेमात सगळे अभिनेते बुजुर्ग होते, त्यामुळे त्यांना रिटायर्ड फौजी म्हणून दाखविता आले. नव्या सिनेमात बहुतांशी कलाकार हे तरुण व मध्यमवयीन असल्याने त्यांना रिटायर्ड न दाखवता, फक्त इतकाच बदल करता येईल. की सर्व कलाकार वेगवेगळ्या सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये आहेत आणि सुट्टी काढून सर्व एका निसर्गरम्य गावात आपली सुट्टी एन्जॉय करायला आले आहेत. बाकी पुढची कथा चायना गेट मध्ये सर्व फौजी गावात आल्यानंतर जी कथा घडते, तशीच राहील. माझ्यासाठी सिनेमाची कास्टिंग अशी राहील.
ओम पुरी = अभय देओल - कर्नल पुरी यांच्या भूमिकेत मला अभय देओलला बघायला आवडेल. ओम पुरी यांच्यासारखा दमदार आवाज जरी नसला, तरी तो भूमिका मात्र दमदारपणे साकारेल
डॅनी डोंझेप्पा = इरफान खान - मेजर गुरंग च्या साठी इरफान हवा. उंचपुरा, डोक्यावर हॅट घातलेल्या लुक मध्ये इरफान मस्त दिसेल. खासकरून हॉस्पिटल मधला ब्लड कॅन्सर वाला सीन इरफान मुळे छान जमून येईल.
अमरीश पुरी = बोमन इराणी - या सगळ्या टीम मधील सिनिअर असलेलं पात्र. अमरीश पुरी यांनी साकारलेली भूमिका बोमन इराणी यांना करायला नक्कीच आवडेल. खासकरून अमरीश पुरीचं सिनेमातील कायम त्रासलेलं, वैतागलेलं पात्र ते छान उभं करतील.
नासिरुद्दीन शाह = के के मेनन - सर्फराजचा महत्वाचा रोल मी माझ्या आवडत्या के के मेनन ला देईल. लाली मध्ये आपल्या मुलीला बघणारा, तिच्यासाठी हळवा होणारा सर्फराजसाठी के के उत्तम राहील. त्याच सिनेमात बोमन इराणी सोबत असलेलं शाब्दिक युद्ध बघायला पण रंगत येईल.
या मेन कॅरेक्टर सोबत यांच्या टीम मधले बाकी सदस्य पुढील प्रमाणे राहतील.
अंजन श्रीवास्तव - विनय पाठक
कुलभूषण खरबंदा - पंकज त्रिपाठी
जगदीप - संजय मिश्रा
विजू खोटे - राजेश शर्मा
टिनू आनंद - रणवीर शौरी
के डी चंद्रन - सुशांत सिंग
मुकेश तिवारी = नवाझुद्दीन - खलनायक जगिरा साठी नवाझुद्दीन बेस्ट राहील. त्याचा लुक ही तसाच आहे. वेगळ्या शैलीत डायलॉग बोलणं हि त्याची खासियतच आहे. त्यामुळे जगिरा च्या भूमिकेत तो आपल्याकडील रंग भरून, ती अजून उठावदार करेल.
परेश रावल = मनोज बाजपेयी - बेरकी इन्स्पेक्टर च्या रूपात मनोज बाजपेयी छान राहील. तो त्या भूमिकेचं बेरिंग पण उत्तम घेईल.
समीर सोनी = राजकुमार राव - या सगळ्यात जुनिअर असलेला, तसेच इंडस्ट्री मध्ये पण यांना जुनिअरच आहे. त्यामुळे तो या भूमिकेत योग्य वाटतो.
ममता कुलकर्णी = राधिका आपटे - राजकुमार राव ची राधिका सोबत जोडी बघायला आवडेल
रझाक खान = विजयराज - लाली च्या खडूस काकाच्या भूमिकेत विजयराज शोभून दिसेल, स्क्रीन टाइम कमी असला तरी.
हितेश पटेल = सौरभ शुक्ला - गावाच्या सरपंचाची फक्त २-३ सीन असलेल्या भूमिकेत सौरभ शुक्ला असतील. कारण ते दिसतात पण अगोदरच्या सिनेमात सरपंच असलेले हितेश पटेल यांच्यासारखे.
शिवाजी साटम आणि इला अरुण = जयदीप अहलावत आणि दिव्या दत्ता
गिरीश कर्नाड = रजत कपूर
टीप = सिनेमात फक्त एकच गाणं राहील ते म्हणजे "छम्मा छम्मा" यासाठी सनि लिओनीलाचं घ्यायचंय. ती असली कि गाणं अजून कडक होईल.
( हा लेख मी फेसबुक वर एका सिनेमाच्या पेजसाठी लिहिला आहे)
शुभम शांताराम विसपुते
No comments:
Post a Comment