Tuesday, April 14, 2020

तू ही तो मेरी दोस्त है....!!!



प्रिय काजोल,

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात निदान एक तरी मैत्रीण असतेच. ज्यांच्या कडे नाहीये, त्यांनी लवकरात लवकर एक मैत्रीण बनवायला हवी. अन्यथा, असे पुरुष खूप मोठ्या सुखापासून स्वतःला वंचित ठेवत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. सुदैवाने माझ्या आजवरच्या आयुष्यात मला मैत्रिणींची कमी कधीच भासली नाही. शाळेत असतानाच मैत्रीण या नात्याशी ओळख झाली. पुढे कॉलेजला गेल्यावर तर मैत्रिणींची संख्या वाढणे हे तर स्पष्टच होत. मी तीन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकलोय त्यामुळे तिघी कॉलेजमध्ये मैत्रिणी या होत्याच. कॉलेज नंतर जॉब केला, तेव्हा ऑफिस ला अजून नव्या मैत्रिणी मिळाल्या. पण वरीलपैकी कुठेही न भेटलेली अशी फेव्हरेट मैत्रीण म्हणजे "काजोल" (तुझं खरं नाव जरी काजल असलं तरी मी तुला काजोलचं म्हणतो, फोन मध्ये हि तसंच नाव सेव केलय) 

आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते? हे तुझ्या बाबतीत मात्र तंतोतंत लागू पडतं. म्हणजे बघ ना तू जवळपास चार वर्षे माझ्या घराच्या अगदीच जवळ राहत असताना देखील तुझ्याबाबत मला काहीच माहित नव्हतं. तू आमच्या कॉलेजच्या शेजारीच असलेल्या कॉलेजला होती तेव्हा देखील काही माहित नाही. अर्थात तू जुनिअर असल्यामुळे तुझ्याशी ओळख असण्याचं काही कारण नव्हतं. पण वर म्हटल्याप्रमाणे जर ओळख होणार हे जर निश्चित असेल तर ती कधीनाकधी होणार असतेच. आपलंही असच झालं, ध्यानीमनी नसताना मी ग्रुप मध्ये जॉईन झालो आणि फायनली  इतक्या वर्षांपासून राहून गेलेली आपली ओळख शेवटी झालीच. 

कुठल्यातरी पुस्तकाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा तुला पाहिलं. त्या अगोदर मला फक्त माहित होत कि काजल नावाची एक मुलगी आहे, आणि ती गणेश ची बहीण आहे. हे मला राकेश ने सांगितलं असल्यामुळे तुला बघण्याची उत्सुकता होतीच. त्या कार्यक्रमात तुला पाहिलं. ती भेट तशी अगदीच फॉर्मल अशी होती. त्यामुळे त्याबद्दल आवर्जून लक्षात ठेवण्यासारखं असं काही नाहीय. पुढे रोझ गार्डन ला आपला सगळा ग्रुप जेव्हा नियमित भेटायचा. तेव्हा हळूहळू तुझ्याबद्दल कळायला लागलं. तेव्हा गार्डन मधल्या दोन गोष्टी होत्या की ज्या लक्षात राहिल्या, त्यात पहिली म्हणजे तुझा लॅपटॉप. मला खरच नवल वाटायचं कि पोरगी एमपीएससी करतेय आणि डायरेक्ट लॅपटॉप घेऊन येते. असंही नाही की, इंजिनीरिंग वैगेरे ला आहे. पण तो लॅपटॉप भारी होता म्हणजे आहेच. आणि दुसरी गोष्ट होती तुझी नॉनस्टॉप चालणारी बडबड. म्हटलं यार ही पोरगी कित्ती बोलतेय, थांबत पण नाही बोलताना. पेट्रोल भरायला गाड्या थांबतात तशी फक्त पाणी प्यायला थांबते बस्स.

पुढे आपली खऱ्या अर्थाने ओळख झाली ती मेहरूण ट्रॅक वर वाढदिवस सेलिब्रेट करताना. पण आपल्यातला डायलॉग हा नेहाच्या बर्थडे पासून सुरु झाला. या गोष्टीला साधारणतः ७-८ महिने झाले असतील. तेव्हाच बोलताना तू बोलली होतीस की अजयने मला तू "दामिनी" सिनेमा बद्दल लिहिलेली पोस्ट दाखवली. तू खूप छान लिहितोस. मग मी तुला म्हटलं की, मी रेग्युलरली नाही लिहीत असंच कधीतरी लिहितो. तेव्हा तूच सल्ला दिला होता की, जे काय लिहिशील ते ब्लॉग वर पोस्ट करत जा. मस्त ब्लॉग वैगेरे लिही. तुझा तोच सल्ल्ला मनावर घेऊन मी शिस्तीत ब्लॉग लिहायला लागलो, आणि तेव्हापासूनचा आज हा माझा ४२ वा ब्लॉग आहे. जो की तुझ्याबद्दलच आहे. मला वाटत हे एक प्रकारचं सर्कलच पूर्ण होतंय. 

ओळखीचं रूपांतर खऱ्या अर्थाने मैत्रीत तेव्हा झालं, जेव्हा सरदार सरोवर ला ट्रिप ला जायचं आपलं ठरलं. तेव्हापासून आपला डिजिटली कॉन्टॅक्ट पण वाढला. ट्रिप ची तयारी करतानाचा तुझा उत्साह म्हणजे हाईट होती. त्या काळात तुझा रोज दिवसभर एकच मॅसेज किंवा कॉल असायचा तो म्हणजे तयारी कशी चाल्लीय, काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचंय ते सांगण्यासाठी आणि सर्वात महत्वाच म्हणजे तिथलं राहण्याचं बुकिंग झाल का? रेल्वे स्टेशन वर पोहचेपर्यंत आपलं हेच बोलणं होत होत. पण ट्रिप यशस्वी होण्यात जर सगळ्यात महत्वाचं क्रेडिट कोणाचं असेल तर ते तुझंच आहे. हे मी उगाच तुझ्याबद्दल लिहितोय म्हणून असं म्हणतोय असं नाही. आपले बाकीचे मेम्बर्स मलापण क्रेडिट देतात, पण माझं काम फक्त सरदार सरोवरचे तिकीट बुक करणं आणि तिथं आपल्या मुक्कामाची चांगली व्यवस्था करणं इतकंच होत. त्यामुळे या व्यतिरिक्त ट्रिप मध्ये तू, तुझ्या ममी-पपांना (एकदम गोडं माणसं) सोबत घेऊन जी काही सर्व व्यवस्था केली होतीस. मग त्यात तुझ्या घरचा मुक्काम असो, आयुष्यभर चव लक्षात राहील असं तुझ्याघरच जेवण आणि नाश्ता असो, की गाडीची बुकिंग करणे असो. प्रत्येक गोष्ट तू एकदम परफेक्ट केली. त्यातलं एक काम जे की अजूनही सुरूय आणि यापुढेही सुरु राहील ते म्हणजे, सर्वाना अगोदर जेवायला वाढणं, आग्रह करू करू खाऊ घालणं. हे तुझ्या स्वभाव आणि संस्कारातच असल्याने ते कधी बदलणारही नाही. ट्रिप मध्ये प्रत्येकाला काय हवं नको ते बघताना स्वतः कडे दुर्लक्ष करत होतीस. सगळे ट्रिप चा आनंद लुटत असताना स्वतः मात्र डोळे लाल करून फिरत होतीस. पण असो ते बोलण्याची आता ही जागा नाही. पण ट्रिप मेमोरेबल होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस त्याबद्दल मनापासून सलाम...!

ट्रिप नंतर तर बॉण्डिंग खूप स्ट्रॉन्ग झालं. तुझ्यासारख्या दांडिया क्वीन सोबत दांडिया खेळण्याचा गोल्डन चान्स पण याच काळात मिळाला. प्रॉपर खेळता येत नसताना देखील त्यादिवशी तो चान्स गमवायला नको म्हणून मस्त दांडिया खेळला गेला. बाकी नंतर तर मग भेटणं, बोलणं हे तर नेहमीच व्हायला लागलं. डिसेंबरच्या काळात अजय आणि मी आमच्या जगप्रसिद्ध "मॉर्निंग वॉल्क" ला जायचो. त्यात ज्या प्रकारे तू मला "ए आयटम पलट" असं बोलून आमच्या मॉर्निंग वॉल्क ला जॉईन झालीस, ते मी विसरलो नाहीये. त्याचा बदला योग्य वेळ आली कि नक्कीच घेतला जाईल. नंतर नवीन वर्षात जानेवारी च्या पहिलीच आठवड्यात तुझा बर्थडे आला. अर्थात तो सेलिब्रेट पण मस्त झाला. "लिजंड्स बॉर्न इन जानेवारी" या क्लब मध्ये एका खऱ्या लिजंड्स चा समावेश झाला. 

काजोल, मला कायम असं वाटत की, तू तुझ्या वक्तृत्व, लेखन या गोष्टींकडे दुर्लक्ष नको करायला. या दोघी गोष्टींसाठी लागणारं, म्हणजे वक्तृत्व साठीचा एकदम स्पष्ट असा आवाज आणि लेखनासाठीचा असणारा सेन्स तुझ्याकडे उपजतच आहे. मान्य आहे की, तुला एमपीएससी मध्ये करिअर करायचं आहे. ते महत्वाचं आहेच. फक्त या दोघी गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस हे सांगणं आहे. अरे तु आमच्याच कॉलेज ला येऊन आमच्याच नाकाखालून अकरा हजाराचं बक्षिस घेऊन गेलीय, साधी पोरगी आहे का तू. आता लॉकडाऊन च्या काळातली तुझी चित्रकला पण बघायला मिळतेय. जी उत्तमच आहे. तुझ्या एकंदरीत पर्सनॅलिटीला सूट होणारा जॉब हा माझ्या मते तरी "रेडिओ जॉकी" हा आहे. जिथं तुझी नॉनस्टॉप चालणारी बडबड पण ऐकली जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचे तुला पैसे पण मिळतील. यापेक्षा अजून काय हवं.

आमच्या पेक्षा लहान असूनही तू खूपच समजूतदार आहेस. हे आपल्या गृप मधलं कोणीही मान्य करेल. प्रत्येक गोष्टीतला तुझा विचार, ती गोष्ट पूर्ण करण्याचा तुझा उत्साह हा नक्कीच शिकण्यासारखा आहे. सर्वांना समजून घेतेस. जरा कोणी ऑफ वाटलं कि त्याला "तुला काय झालय?", "कसला राग आलाय?" "नॉर्मल का बोलत नाहीये?" असं विचारू विचारू त्याला परत ऑन करतेस. तुझ्यात असणारी पॉसिटीव्हिटी अशीच कायम राहू दे. आताच्या आपल्या संघर्षाच्या काळात फक्त हीच पॉसिटीव्हिटी आपल्याला तरुन नेऊ शकते. हे लक्षात असू दे.

अजूनही अनेक अश्या गोष्टी आहेत कि ज्या बोलायच्या आहेत. मी नेहमी तुला म्हणतो की, आपलं लॉन्ग डिस्कशन बाकीय, ते आपण लवकरच करू. बाकी, तुला इर्रिटेट करणारे माझे पीजे असेच सुरु राहतील कदाचित तू जोवर माझे हक्काचे पन्नास रुपये मला देत नाही तोवर तर ते थांबणार नाही. खरं सांगायचं तर, फक्त तू असतानाच मला असे जोक्स करायची लहर येते. टोमॅटो सूप सारखे जे फोटो आहेत, जे फक्त तुला पाठ्वण्यासाठीच मी डाउनलोड करून ठेवतो. 

बाकी, तुझा रथ चौकात राहणारा शुभम नावाचा मित्र आहे. जो तुझ्यासाठी २४*७ उपलब्ध आहे. कधीही काही लागलं तर मी नेहमीच आहे. अजून खूप लिहावंसं वाटतंय, पण सिरीअसली आता मला सुचत नाहीये काय लिहू ते त्यामुळे मी इथं थांबतो. फक्त जाता जाता महत्वाचं असं एकच सांगतो.

आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू असतात आपली जवळची माणसं. काजोल तु अशीच माझ्यासाठी माझ्या जवळच्या माणसांपैकी एक आहेस. यापेक्षा वेगळं काय सांगणार. आता लॉकडाऊन संपलं की सगळे मिळून मस्त मोठठी पार्टी करू. तोवर काळजी घे, आणि लिस्ट बनवून ठेव की काय काय करायचं आहे ते. बाय.

तुझाच,
सोना चांदी चवनप्राश (असली)   

2 comments: