अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन ची गोष्ट आठवली. अभिताभ उतार वयात खुप कठीण प्रसंगातून गेला होता. ABC (Amitabh Bachchan Corporation) बुडाली. वाढलेल्या वयामुळे चित्रपटात हिरोचं काम कोणी देत नव्हतं. अमिताभ पुरता कंगाल झाला होता. आजवर कधीही टीव्ही वर न आलेल्या अमिताभला टीव्ही वर जाण्याची संधी स्टारकडून चालून आली. अमिताभने ती स्विकारली, कारण दुसरा पर्याय ही नव्हता. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली, सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अमिताभ छोट्या पडद्यावर आला आणि KBC च्या रूपाने त्याने इतिहास घडवला. अगोदर आर्थिक परिस्थिती अगदी व्यवस्थित केली. पुढे चित्रपटात परत संधी चालून आल्या. त्याने कभी खुशी कभी गम, बागबान, पा, सरकार, निशब्ध, चीनी कम, पिकू असे अनेक हिट सिनेमे दिले. भरगोस अश्या जाहिराती केल्या आणि उतारवयात परत तोच बादशाहाचा स्टेटस मिळवला.
अमिताभची गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात अचानक आत्महत्या करून देवाघरी गेलेला सुशांतसिंग राजपूत. सुशांतसिंग लाखो फॅन्सच्या जीवाला चटका लावून गेला. सगळे पर्याय संपले की लोक शेवटचा आत्महत्येचा पर्याय निवडतात. इंडस्ट्रीतील लोक आणि त्याच्या जवळचे सांगतात की सुशांत सिंगला सध्या बिग बॅनरचे चित्रपट मिळत नव्हते म्हणून तो डिप्रेशनमध्ये होता. सर्व लोकांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटते आहे. त्याला चित्रपट मिळू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर टिका होते आहे. मी काही सुशांतचा फॅन वैगेरे नव्हतो, पण त्याचा पदार्पणाचा "काई पो छे" सिनेमा थिएटर ला बघितला होता. अर्थात त्याच कारण सिनेमा चेतन भगतच्या पुस्तकावरून घेतलेला असल्याने हे होत. पण सुशांत लक्षात राहिला. शुद्ध देसी रोमान्स परिणीती साठी बघितला तर तिथेही हा भाव खाऊन गेला. PK मधेही तो असाच लक्षात राहिला. MS DHONI तर त्याच्या कारकिर्दीतला माईलस्टोन सिनेमा, त्याने फक्त धोनी हा एकमेव सिनेमा केला असता तरी तो कायमचा लक्षात राहिला असता. इतकं अप्रतिम काम त्याने या सिनेमात केलंय. सुशांत गेल्यानंतर व्योमकेश बक्षी, सोनचिरिया आणि छीचोरे बघितला. बरेच लोक म्हणत होते कि त्याने छीचोरे सारखा आत्महत्येच्या विरोधात मत मांडणाऱ्या सिनेमात काम करूनही आत्महत्या का केली. हे जरी खर असलं तरी छीचोरे पेक्षाही मोटिव्हेशनल काम त्याने धोनीच्या रोल मध्ये केलंय. जग जिकणाऱ्या धोनीचा रोल करणारा सुशांत स्वतः सोबत मात्र जिंकू शकला नाही.
सुशांत गेला. तो नेमकं कश्यामुळे गेला याच कारण कदाचित कधीच बाहेर येणार नाही. अशी हाय प्रोफाइल पेज थ्री प्रकरणं दाबली जातात. आठवा या अगोदरची दिव्या भारती, जिया खान प्रकरणं. डिप्रेशन, नेपोटिझम अशी अनेक वेगवेगळी कारण ऐकायला मिळताय. सिनेइंडस्ट्री किंवा कुठलेही क्षेत्र घेतले कि तिथे थोड्यमोठ्या प्रमाणात या गोष्टी घडतच असतात. पण यामुळे आपला अमूल्य जीव द्यावा हे मला तरी नाही पटत. प्रॅक्टिकली विचार केला नेपोटीझम हे स्वाभाविकपणे येणारी गोष्ट आहे. दुकानाचा मालक गल्ल्यावर मुलालाच बसवतो ना की दुकानातल्या नोकराला, तसेच राजकीय पुढारी त्याचा उत्तराधिकारीसाठी त्याच्या मुलाला किंवा मुलीलाच निवडतो कार्यकर्त्याला नाही. असंही ऐकण्यात आलं कि त्याला मोठ्या बॅनर्स चे सिनेमे देत नव्हते. पण मोठ्या बॅनर्सचे सिनेमे हवेतच कशाला, आयुष्मान खुराणा, विकी कौशल, राजकुमार राव, कंगना राणावत हे सुशांत सारखेच "आऊटसाईडर्स" ते देखील लो बजेट सिनेमे करून पुढे आले. किंबहुना ते अजूनही अश्याच सिनेमात काम करताय. सुशांत सारख्या अभिनेत्यांना आता उलट इंडस्ट्रीत "अच्छे दिन" आले आहे. कारण आता पब्लिक केवळ हिरो ला बघून सिनेमाला येत नाही त्यांना चांगल्या अभिनयासोबत चांगली स्टोरी पण बघायची असते. यामुळेच आयुष्मान सारखा अभिनेता स्क्रीनवर ऍक्शन न करता केवळ अभिनयाच्या बळावर सलग सात सिनेमे हिट देतो. निदान ह्या गोष्टीचा सुशांतने आवर्जून विचार करायला हवा होता.
एकवेळ आपण मान्यही केलं कि त्याला अजिबात कोणी काम देत नव्हतं तरी तो साउथ इंडियन वा इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट सहज करू शकला असता. तो आधीसारखा छोट्या पडद्यावर परत आला असता तर सुपरडुपर हिट सिरिअल करू शकला असता. उत्तम डान्सर असल्याने डान्स रिऍलिटी शो करू शकला असता. शाॅर्ट फिल्म करू शकला असता. Netflix/Amazon prime वर काम करू शकला असता. OTT प्लॅटफॉर्मला तर आता सोन्याचे दिवस आले आहेत. रंगभूमीवर नाटक करू शकला असता. डान्स अकादमी सुरु करू शकला असता. साठ कोटींचा मालक असल्याने चांगल्या सिनेमांचा निर्माता बनून त्यात स्वतःही काम करू शकला असता. पण आता जा सर्व जर-तर च्या गोष्टी आहेत. तो निघून गेल्याने या गोष्टींना आता किंमत राहिली नाही.
सुशांत गेला हे वाईटच झालं. पण त्याने स्वतःच्या मुक्तीसाठी जो मार्ग निवडला तो पटला नाही. सिनेमात काम करणारा अभिनेता म्हणून लाखो लोकांवर तुमचा प्रभाव पडत असतो. लोकं तुम्ही दाखवलेलं खरं मानत असतात. तुम्हाला फॉलो करत असतात. त्यामुळे तुम्हीच असा मार्ग निवडाल तर त्याचा लोकांवर निगेटिव्ह प्रभाव निश्चितच पडणार. सुशांत गेल्यानंतर जर आठवड्याभरातील वर्तमान पत्रातील बातम्या बघितल्या असतील तर एक लक्षात लक्षात येईल की कोरोनामुळे हातात काम नसल्यामुळे नैराश्य आलेल्यांच्या आत्महत्येत वाढ झालेली दिसून आली आहे. वाईट प्रभाव पडतो तो असा. आपल्याकडे पब्लिक चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी लवकर घेते हे त्याचंच एक उदाहरण आहे. मग छीचोरे सारख्या सिनेमाचा उपयोग काय हाच प्रश्न पडतो.
डिप्रेशन अनेक प्रकारचं असतं आणि त्याची कारणही असंख्य असतात, व्यक्तिसापेक्ष. ती प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी गाठतातच आणि सांगतात लढण्यापेक्षा तू मरून का जात नाहीस? हि भावना वारंवार मनात येते. अश्यावेळी या भावनेला फाट्यावर मारून जगण्यावर विजय मिळवायचा असतो, ना की त्या भावनेच्या आहारी जाऊन स्वतःला संपवायचं असतं. इरफान गेल्यावर जितकं दुःख झालं तितकं सुशांत गेल्यावर नाही याला हेच कारण आहे.
सुशांत, तू फक्त एक चांगला अभिनेता म्हणून आठवणीत राहशील. कारण जीव देण्याची कारणं कितीही पटणारी असली तरीही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची किंमत माझ्या नजरेत शून्य आहे. जिथं कुठं असंशील तिथं सुखी राहा. भावा....!!!
शुभम शांताराम विसपुते
अमिताभची गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात अचानक आत्महत्या करून देवाघरी गेलेला सुशांतसिंग राजपूत. सुशांतसिंग लाखो फॅन्सच्या जीवाला चटका लावून गेला. सगळे पर्याय संपले की लोक शेवटचा आत्महत्येचा पर्याय निवडतात. इंडस्ट्रीतील लोक आणि त्याच्या जवळचे सांगतात की सुशांत सिंगला सध्या बिग बॅनरचे चित्रपट मिळत नव्हते म्हणून तो डिप्रेशनमध्ये होता. सर्व लोकांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटते आहे. त्याला चित्रपट मिळू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर टिका होते आहे. मी काही सुशांतचा फॅन वैगेरे नव्हतो, पण त्याचा पदार्पणाचा "काई पो छे" सिनेमा थिएटर ला बघितला होता. अर्थात त्याच कारण सिनेमा चेतन भगतच्या पुस्तकावरून घेतलेला असल्याने हे होत. पण सुशांत लक्षात राहिला. शुद्ध देसी रोमान्स परिणीती साठी बघितला तर तिथेही हा भाव खाऊन गेला. PK मधेही तो असाच लक्षात राहिला. MS DHONI तर त्याच्या कारकिर्दीतला माईलस्टोन सिनेमा, त्याने फक्त धोनी हा एकमेव सिनेमा केला असता तरी तो कायमचा लक्षात राहिला असता. इतकं अप्रतिम काम त्याने या सिनेमात केलंय. सुशांत गेल्यानंतर व्योमकेश बक्षी, सोनचिरिया आणि छीचोरे बघितला. बरेच लोक म्हणत होते कि त्याने छीचोरे सारखा आत्महत्येच्या विरोधात मत मांडणाऱ्या सिनेमात काम करूनही आत्महत्या का केली. हे जरी खर असलं तरी छीचोरे पेक्षाही मोटिव्हेशनल काम त्याने धोनीच्या रोल मध्ये केलंय. जग जिकणाऱ्या धोनीचा रोल करणारा सुशांत स्वतः सोबत मात्र जिंकू शकला नाही.
सुशांत गेला. तो नेमकं कश्यामुळे गेला याच कारण कदाचित कधीच बाहेर येणार नाही. अशी हाय प्रोफाइल पेज थ्री प्रकरणं दाबली जातात. आठवा या अगोदरची दिव्या भारती, जिया खान प्रकरणं. डिप्रेशन, नेपोटिझम अशी अनेक वेगवेगळी कारण ऐकायला मिळताय. सिनेइंडस्ट्री किंवा कुठलेही क्षेत्र घेतले कि तिथे थोड्यमोठ्या प्रमाणात या गोष्टी घडतच असतात. पण यामुळे आपला अमूल्य जीव द्यावा हे मला तरी नाही पटत. प्रॅक्टिकली विचार केला नेपोटीझम हे स्वाभाविकपणे येणारी गोष्ट आहे. दुकानाचा मालक गल्ल्यावर मुलालाच बसवतो ना की दुकानातल्या नोकराला, तसेच राजकीय पुढारी त्याचा उत्तराधिकारीसाठी त्याच्या मुलाला किंवा मुलीलाच निवडतो कार्यकर्त्याला नाही. असंही ऐकण्यात आलं कि त्याला मोठ्या बॅनर्स चे सिनेमे देत नव्हते. पण मोठ्या बॅनर्सचे सिनेमे हवेतच कशाला, आयुष्मान खुराणा, विकी कौशल, राजकुमार राव, कंगना राणावत हे सुशांत सारखेच "आऊटसाईडर्स" ते देखील लो बजेट सिनेमे करून पुढे आले. किंबहुना ते अजूनही अश्याच सिनेमात काम करताय. सुशांत सारख्या अभिनेत्यांना आता उलट इंडस्ट्रीत "अच्छे दिन" आले आहे. कारण आता पब्लिक केवळ हिरो ला बघून सिनेमाला येत नाही त्यांना चांगल्या अभिनयासोबत चांगली स्टोरी पण बघायची असते. यामुळेच आयुष्मान सारखा अभिनेता स्क्रीनवर ऍक्शन न करता केवळ अभिनयाच्या बळावर सलग सात सिनेमे हिट देतो. निदान ह्या गोष्टीचा सुशांतने आवर्जून विचार करायला हवा होता.
एकवेळ आपण मान्यही केलं कि त्याला अजिबात कोणी काम देत नव्हतं तरी तो साउथ इंडियन वा इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट सहज करू शकला असता. तो आधीसारखा छोट्या पडद्यावर परत आला असता तर सुपरडुपर हिट सिरिअल करू शकला असता. उत्तम डान्सर असल्याने डान्स रिऍलिटी शो करू शकला असता. शाॅर्ट फिल्म करू शकला असता. Netflix/Amazon prime वर काम करू शकला असता. OTT प्लॅटफॉर्मला तर आता सोन्याचे दिवस आले आहेत. रंगभूमीवर नाटक करू शकला असता. डान्स अकादमी सुरु करू शकला असता. साठ कोटींचा मालक असल्याने चांगल्या सिनेमांचा निर्माता बनून त्यात स्वतःही काम करू शकला असता. पण आता जा सर्व जर-तर च्या गोष्टी आहेत. तो निघून गेल्याने या गोष्टींना आता किंमत राहिली नाही.
सुशांत गेला हे वाईटच झालं. पण त्याने स्वतःच्या मुक्तीसाठी जो मार्ग निवडला तो पटला नाही. सिनेमात काम करणारा अभिनेता म्हणून लाखो लोकांवर तुमचा प्रभाव पडत असतो. लोकं तुम्ही दाखवलेलं खरं मानत असतात. तुम्हाला फॉलो करत असतात. त्यामुळे तुम्हीच असा मार्ग निवडाल तर त्याचा लोकांवर निगेटिव्ह प्रभाव निश्चितच पडणार. सुशांत गेल्यानंतर जर आठवड्याभरातील वर्तमान पत्रातील बातम्या बघितल्या असतील तर एक लक्षात लक्षात येईल की कोरोनामुळे हातात काम नसल्यामुळे नैराश्य आलेल्यांच्या आत्महत्येत वाढ झालेली दिसून आली आहे. वाईट प्रभाव पडतो तो असा. आपल्याकडे पब्लिक चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी लवकर घेते हे त्याचंच एक उदाहरण आहे. मग छीचोरे सारख्या सिनेमाचा उपयोग काय हाच प्रश्न पडतो.
डिप्रेशन अनेक प्रकारचं असतं आणि त्याची कारणही असंख्य असतात, व्यक्तिसापेक्ष. ती प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी गाठतातच आणि सांगतात लढण्यापेक्षा तू मरून का जात नाहीस? हि भावना वारंवार मनात येते. अश्यावेळी या भावनेला फाट्यावर मारून जगण्यावर विजय मिळवायचा असतो, ना की त्या भावनेच्या आहारी जाऊन स्वतःला संपवायचं असतं. इरफान गेल्यावर जितकं दुःख झालं तितकं सुशांत गेल्यावर नाही याला हेच कारण आहे.
सुशांत, तू फक्त एक चांगला अभिनेता म्हणून आठवणीत राहशील. कारण जीव देण्याची कारणं कितीही पटणारी असली तरीही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची किंमत माझ्या नजरेत शून्य आहे. जिथं कुठं असंशील तिथं सुखी राहा. भावा....!!!
शुभम शांताराम विसपुते
